Showing posts with label Fort. Show all posts
Showing posts with label Fort. Show all posts

29 November 2009

peth fort - kothaligad ( पेठ चा किल्ला - कोथळीगड )

कोथळीगड प्रकार: गिरिदुर्ग मध्यम
डोगररांग : भीमाशंकर
जिल्हा : रायगड.
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ की.मी. अंतरावर आहे. सिद्धगड-भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा दाखवत हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या किल्ल्च्या पायाथातील पेठ या गावामुळे या किल्ल्याला पेठचा किल्ला असेही संबोधले जाते. कोठलीगड तसा दिसायला छोटासा पण याला जो रक्तरंजित इतिहास लाभला आहे तो मोठमोठ्या किल्ल्यानाही लाभला नसेल. या विषयाची माहित मराठी व इग्रजी कागद पत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रामधून मिळते. हा किल्ला काही बलाढय दुर्गा नाही पण आपल्या बेलाग सुळक्यावरच एक संरक्षक ठाण होता. या मुळेच या किल्ल्यावर मराठाचे शस्त्रागार होते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहूबाजूंनी तसल्यासारखा पेठचा सुळका दिसतो. पाय वाटेने वर पोहोचल्यावर समोरचा कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम देवीची गुहा, पाण्याचे टाके आणि मग डावीकडील ऐसपैस भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल, भूमी व छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब.
गुहेजवळच एका उध्वर्मुखी भूयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. गडमाथ्यावरून भीमाशंकर कडील कलावंतीणीचा महाल, नागफणी वाघाचा डोळा,गोरखगड, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शालगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो.
गडावर जाण्याच्या वाटा : कर्जतहून एसटी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात येणे. हे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाचा पायथ्याला पेठ हे गाव आहे. गावातून वाट सरळ किल्लाच्या प्रवेशद्वाराशी घेऊन जाते. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास साधारण २ तास लागतात. पेठ गावातून साधारण १ तास.

हा किल्ला नियम ३२ अन्वये प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम १९५६ अन्वये संरक्षित करण्यात आला आहे.

28 July 2009

Rajmachi Fort Trek - किल्ले राजमाची भटकंती

Rajmachi Fort Trek - किल्ले राजमाची भटकंती
राजमाची प्रकार : गिरिदुर्ग, मध्यम
डोंगररांग : लोणावळा पुणे.



सह्याद्रीच्या लोणावळा खंडाला पासून निघाणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर "उल्हास नदीचे खोरे" म्हणून ओळखला जातो.  याच प्रदेशात मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येला १५ किमी. अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण नालासोपारा हि प्राचीन काळातील मोठ्या व्यापाराच्या बंदरातून पुण्याकडे याच मार्गाने होत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे.  राजमाची वरून एका बाजूस मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी, माथेरान असा परिसर नजरेस पडतो. यामुळे हा किल्ला एक लष्करी ठिकाण असावे, या किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत हे बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र किल्लेच होय.


Datta niwas


Waterfall normal view


Waterfall Zoom Mode


Waterfall Zoom Mode


Waterfall Zoom Mode



























Popular Posts