Showing posts with label रंग माझा वेगळा - vivek mahadik. Show all posts
Showing posts with label रंग माझा वेगळा - vivek mahadik. Show all posts

23 March 2011

राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो


राजे...........

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी खरे कुणीच बोलणार नाही

गाईडहोण्याची संधीही मी कशाला हुकवतो?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून
? की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी
? कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका
, कुणालाच उपदेश नको,
"
आपापसात लढू नका" तेव्हाही पटले नाही, आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने काळ बघा कसा सोकावतो
?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर बघा स्वत:लच फ़सवतो
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख
, ते बघा नवे देशपांडे, वतनदारीसाठी टपलेले आहेत 
त्यांच्या आतली काळी माणसं खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री आपला माथा झुकवतो
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की
बाजीलावावी तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.

"
आधी लगीन कोंढाण्याचे"म्हणण्याची आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची आज रायबाला किंमत नाही.
जो तो सोईप्रमाणे आज इतिहासाला वाकवतो.
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला लागले परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा बघा आपल्यालाच कसा चकवतो
?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघ प्रतापगड सांगतोय
, इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश
, तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच
, ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद
,मुरारबाजी, नेताजी,हिरोजी आणि मदारी आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची
, मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना
, खूप झाले सेनापती, सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही
, आजच्या राजकारणाची हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता पटकन डिजिटल ब्यानर दाखवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की
, पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे
,छाव्याला जामीन ठेवायला, वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

राजे
,यांना शहाणे समजू नका, हे तर चक्क बावळे आहेत.
तुम्हाला केलेय देव त्यांनी
, तुमची इथे देवळे आहेत.
लाज वाटते म्हणून सांगतो
, आम्ही पदरचे रेटत नाही.
तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी
? आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.
खरा इतिहास राहिला बाजूला
, ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की
, जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे
,चूकुनही बघू नका त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते तरीही विचारतात
, हप्ता का थकवतो ?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका
, पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

जसे राजकारणाचे
, तसे साहित्याचेही झाले आहे.
सहकाराला स्वाहाकाराचे बकासुरी रूप आले आहे.
आया-बहिणींच्या इज्ज्तीची समस्या तर जटील आहे.
नाक्या-नाक्यावर उभा जणू रांझ्याचा पाटील आहे. लोकशाहीचा पाईक मी
,

राजे
, चला मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

04 October 2010

चिऊ-चिऊ दार उघड... An Un-narrated Love Story


चिऊ-चिऊ दार उघड... An Un-narrated Love Story

 




एक होता काऊ अन्‌ एक होती चिऊ,
काऊचं घर होतं शेनाचं, चिऊचं घर होतं मेनाचं.
एके दिवशी काय झालं, खूप मोठ्ठा पाऊस आला.
त्यामुळे काऊचं शेनाचं घर पावसामध्ये वाहून गेलं.
मग काऊ चिऊकडे आला आणि म्हणाला... चिऊ-चिऊ दार उघड


चिऊ म्हणाली: थांब मझ्या लेकराला आंघोळ घालू दे ...
चिऊ-चिऊ दार उघड...थांब मझ्या लेकराला साबण लावू दे...
चिऊ-चिऊ दार उघड ...थांब मझ्या लेकराला............
चिऊ-चिऊ दार उघड ...थांब मझ्या लेकराला...............
दिवस सरले, महिने सरले, दार काही उघडलं नाही
रात्रं-दिवस वाट बघण्याशिवाय, दुसरं काहीच घडलं नाही...
पावसाळा बेभान कोसळत रहिला, काऊ तसाच भिजत राहिला
चार-दोन पानांच्या आडोशाला, पंखात चोच खुपसून निजत राहिला...
गार वाऱ्याच्या झुळका घेऊन मग हिवाळा आला,काऊने त्याचा शेनाचा बंगला पुन्हा नव्याने सारवला...
उन्हाळ्यात मात्र चिऊची तारांबळ उडाली,मेनाची तिची झोपडी हळू-हळू वितळू लागली...
तेव्हा, पिलांच्या जीवाचे तिला भिऊ वाटले,
आधारासाठी तिने मग काऊचे घर गाठले...
चिऊची चाहूल दूरूवरूनच त्याच्या कानावर पडली होती,
तिने हाक मारण्याआधिच काऊने दारं उघडली होती...
चिऊने कौतुकाने घराची पारख करून घेतली,
पिलांना मग काऊमामाची !!! ओळख करून दिली...
क्षणभरात काऊ खिन्न झाला, सुन्न झाला,


अन्न-धान्य आणतो सांगून भू‌‌र्र उडून गेला...
सांज ढळली.,  

अकाशातली एकएक चांदणीही विझून गेली,
वाट पाहून काऊची, मग चिऊही थकून निजून गेली...
ह्ळूवार पावलांनी - सावळ्या सावल्यांनी, तिच्या नकळत, रात्री तो आला...
गव्हाचे दाणे, आठवांचे गाणे, अलगद तिच्या चोचीत ठेवून, नेहेमीसाठी निघून गेला...





आषाढाचे घन पुन्हा दाटून आले., चिऊ तिच्या घरी परतली,
या पावसाळ्यात मात्र तिने कधिच दाराला कडी नाही घातली...
धुंद कोसळत्या पावसात, तिच्या कानी, ध्यानी-मनी, आता त्याचीच हाक घुमत असते.,




घनदाट काळ्या काळोखाच्या रात्रीही ती, त्या काळ्या काऊचीच वाट बघत बसते...

02 October 2010

किल्ले विसापूर

किल्ले विसापूर

लोणावळा- मालवली पासून हाकेचा अंतरावर असणारा विसापूर किल्ला लोहागडच एक भाग म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्रातील ८०%  ते ९०% किल्ले १३ ते १४ शतकातील असतील तसं विसापूर बद्दल नक्की नाही, हा किल्ला अगदी  अलीकडच्या काळातील म्हणजे शिवाजी महाराजाच्या हि नंतर पेशवाईत उभारण्यात आला.

लोह्गडच्या तुलनेत हा तसा सावत्रच राहिला.... पण इतिहासात याची नोंद ज्याचा विसापूर त्याचा लोहगड अशीच राहिली.... लोह्गडच्या तुलनेत हा त्याचा पेक्षा उंच विस्तीर्ण असूनही हा नेहमी डावाचा राहिला.



गडाची तटबंदी अजूनही पाहण्यासारखी आहे, गडावर मोडकळीस आलेल्या दोन छप्पर नसलेल्या इमारती आहेत,


पाण्यासाठी गडावर दगडात कोरलेले तलाव व गुहा आहेत.



गडावर मारुतीचे दगडात कोरलेले ६ फुटी शिल्प आहे तेच या गडाचे आराध्य दैवत.

पाटण गावातून गडावर येताना गडाच्या तटबंदीला लागूनच एका गुहे जवळ मारुतीचे आणखी एक सुंदर शिल्प आहे.



आता गड हा आजूबाजूच्या गावातील गुराचे कुरण झाले आहे.

 



06 February 2010

राजपुत्र बिहारात बहु बडबडला ….

काय करणार , समोरचा चुकीचा असून त्याची चूक दाखविण्याची आपल्या लोकांची पद्धत चुकीची होती, कोणत्याही परप्रांतीयाला काहीही धोका नसताना , महाराष्ट्रावर जी टीका होतेय त्याचे वाईट वाटतेय ,

माध्यमांच्या आईचा घो ................ त्यांना नेहमी आमचीच चूक का दिसते ?

समोरचाही चुकतो न , मग त्यांच्या गोष्टींची चर्चा का नाही होत .......

राम माधव म्हणे संरक्षण देणार , कोणाला आणि का ? कोणाचा जीव धोक्यात आहे इथे ?

भोसडीचे इथे येतात राहतात आणि आपल्यावरच मज करतात ?

महाराष्ट्राने कधी कोणाला अडवलंय, मुंबई ला मिनी इंडिया म्हणतातना .......

मग तुम्हाला ४० ४० वर्षे इथे राहून फक्त मराठी बोलता येत नाही , शिकायचे म्हणाले तर किती अवघड आहे , पण शिकायचेच नाहीना ???????

05 February 2010

राहुल, जरा चुकलंच...!

'राहुल गांधींकडे आम्ही एक तरुण नेता म्हणून पाहतो. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी वाटते. पण मुंबईवरील हल्याबाबत ते जे बोलले ते ऐकल्यावर डोक्यात गेले. त्यांचं चुकलंच.... तरुणांची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे.

शुक्रवारी राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांशी चर्चा केली असता मुंबई हल्ल्याबाबत त्यांनी केलेली वक्तव्ये आमच्या मनातील त्याच्या प्रतिमेला धक्का लावणारी आहेत अशी प्रतिक्रिया तरुणांमधून व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे हा राहुल गांधींचा इलेक्शन स्टंट आहे, याचे भानही तरुणांना आहे.

'राहुल इतर राजकीय नेत्यांपेक्षा किंवा नेत्यांच्या मुलांपेक्षा वेगळे वाटतात कारण त्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे, त्यांना काम करण्याची इच्छा आहे असे वाटते,' इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असणारा अनुपम सांगतो. युथ आयकॉन म्हणून ते योग्य आहेत पण मुंबई हल्ल्याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर ते जाम डोक्यात गेले', अनुपमची संतापून सांगतो. एका खाजगी कंपनीत सेक्रेटरीची नोकरी करणाऱ्या मयुरीला राहुल गांधी बायस वाटायला लागलेत.

'देशाच्या प्रगतीबाबतचे त्यांचे भाषण ऐकले होते. पण मुंबई बद्दल बोलून त्यांनी फार मोठी चूक केली आहे. एकतर ते चुकीचे बोलले आणि दुसरं म्हणजे मराठी माणसाला त्यांनी टागेर्ट केलं. देशाची प्रगती साधायची असेल तर त्यांनी जात, धर्म मध्ये आणू नयेत', असे मयुरी म्हणते. द्वेषावर आधारित राजकारण सोडून द्या असे राहुल यांनी एका भाषणात सांगितले, तेव्हा ते डायनॅमिक वाटले होते. पण आता तेही तेच
टिपिकल राजकारण खेळू लागलेत असे मत अॅनिमेशनचा कोर्स करणाऱ्या मानसीने मांडले. 'राहुल अजूनही 'ममाज बॉय' आहेत, त्यांना काय बोलावं हे कळत नाही असे मानून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, तेही बायस आहे हे यातून कळलेच आहे अशी प्रतिक्रिया सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रतिकने नोंदवली. 'ते मुंबईत आले, न आल्याने काही फरकच पडणार नसेल तर त्यांच्याबद्दल बोलायचं कशाला ? 'असा प्रश्न प्रतिक देसाईने उपस्थित केला. मराठी माणसांना दुखवून बिहारी लोकांची मतं
मिळविण्याचा स्टंट असेल तर मराठी माणसांचा अपमान करण्याची त्यांना गरजच नव्हती, २६/११ ची दहशत मुंबईकरांनी अनुभवली आहे. त्याचे राजकारण करून त्यांनी मोठी चूक केली आहे असे तरुणांचे म्हणणे आहे.

--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

29 November 2009

peth fort - kothaligad ( पेठ चा किल्ला - कोथळीगड )

कोथळीगड प्रकार: गिरिदुर्ग मध्यम
डोगररांग : भीमाशंकर
जिल्हा : रायगड.
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ की.मी. अंतरावर आहे. सिद्धगड-भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा दाखवत हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या किल्ल्च्या पायाथातील पेठ या गावामुळे या किल्ल्याला पेठचा किल्ला असेही संबोधले जाते. कोठलीगड तसा दिसायला छोटासा पण याला जो रक्तरंजित इतिहास लाभला आहे तो मोठमोठ्या किल्ल्यानाही लाभला नसेल. या विषयाची माहित मराठी व इग्रजी कागद पत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रामधून मिळते. हा किल्ला काही बलाढय दुर्गा नाही पण आपल्या बेलाग सुळक्यावरच एक संरक्षक ठाण होता. या मुळेच या किल्ल्यावर मराठाचे शस्त्रागार होते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहूबाजूंनी तसल्यासारखा पेठचा सुळका दिसतो. पाय वाटेने वर पोहोचल्यावर समोरचा कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम देवीची गुहा, पाण्याचे टाके आणि मग डावीकडील ऐसपैस भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल, भूमी व छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब.
गुहेजवळच एका उध्वर्मुखी भूयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. गडमाथ्यावरून भीमाशंकर कडील कलावंतीणीचा महाल, नागफणी वाघाचा डोळा,गोरखगड, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शालगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो.
गडावर जाण्याच्या वाटा : कर्जतहून एसटी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात येणे. हे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाचा पायथ्याला पेठ हे गाव आहे. गावातून वाट सरळ किल्लाच्या प्रवेशद्वाराशी घेऊन जाते. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास साधारण २ तास लागतात. पेठ गावातून साधारण १ तास.

हा किल्ला नियम ३२ अन्वये प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम १९५६ अन्वये संरक्षित करण्यात आला आहे.

28 November 2008

एक रात्र अशीही ....टार्गेट मुंबई

एक रात्र अशीही ....टार्गेट मुंबई


शिवाजी छ्त्रपती टर्मिनस


नरीमन हॉउस







शिवाजी छ्त्रपती टर्मिनस


ताज होटल


शिवाजी छ्त्रपती टर्मिनस


ताज होटल


अतिरेकी






ताज सकाळी

27 November 2008

तार्कर्ल्लीचा समुद्राकिनारा

तार्कर्ल्लीचा समुद्राकिनारा
माझी समुद्रकिनारे पाहण्याची सवय तशी जुनिचा आहे तस्सा मी गोवातील पुष्कल किनारे पाहिले असतील पन जरा वेगलेपनासाठी महाराष्ट्रातील दुल्कक्षित किनारे पहायचा ठरवून घरातून मित्राना घेउन निघालो.

नेहमीप्रमाने रात्रीच्या कोकंणकन्या एक्सप्रेसने घिविम ला पोहचलो नेहमीप्रमाने कलंगुट बागा अंजुना बिचला भेट देवून थोड रुचिपलत म्हणुन मोर्जी बिच, आश्विन बिच पाहून केरी गोवाची महाराष्ट्राकडील किनारपट्टी पहयाचा ठरवून केरीला पोहचलो,


मोर्जी बिच मी अन अमित

केरि तो शांत समुद्रकिनारा पहिला आणि खरच कहितर वेगळ पाहिल्याचा आनंद झाला.

केरी समुद्रकिनारा

तरीने तेरेखोल नदी पारकरून तेरेखोल किल्ला पहिला, तेरेखोल किल्ला आता एक हेरिटेज होटल झाला आहे


तेरेखोल किल्ला - तेरेखोल हेरिटेज होटल

आता खरी भटकांतिची मजा येत होती तेरेखोल किल्ला पाहून आम्ही शिरोडाकडे निघालो,



शिरोडा सावंतावाडी कुडाल मार्गे सायंकाली मालवणला पोहोचलो, रात्रि नाथपै वसतिगृहात राहून पहाटे तर्काल्ली कड़े निघालो,


नाथपै वसतिगृह

वाटेत रॉक गार्डन जय गणेश मन्दिर करत तर्काल्लीला पोहचलो आणि तो किनारा पाहून मंत्रमुग्ध झालो, अथंग समुद्रकिनारा मधेचा डोकेवर करुन पहनारी खडकाची टोक मधोमध उभा सिंधुदुग्र किल्ला, नित्तल स्वाच्छ पानी पाहून मन खुश झाला.....


तार्कर्ल्ली बीच - मुस्तफा

पुढली सफर सिंधुदुग्रची ......

Popular Posts